Posts

Showing posts from May, 2021

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या.

Image
  सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या. विहीरीत उडी मारुन संपवीला आपला संसार   मुखेड प्रतिनिधी :- दिसायला काळी आहेस , लग्नात मानपान केला नाही म्हणून माहेराहून एक लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी मानसिक व शारीरिक छळ करून या होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुखेड तालुक्यातील मौजे कबनूर येथे विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली . या प्रकरणात सासरच्या आठजणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे . कबनूर हे सासर असलेल्या श्रीदेवी संभाजी पांचाळ या विवाहितेला सासरच्या मंडळीकडून पैशाची मागणी करण्यात येत होती ; परंतु माहेरची परिस्थिती बेताची असल्यामुळे श्रीदेवी या पैसे आणण्यास असमर्थ होत्या . मागणी पूर्ण होत नसल्याने सासरच्या मंडळींकडून दिला जाणारा त्रास वाढला होता . त्यामुळे निराश झालेल्या श्रीदेवी यांनी १७ मे रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती . या प्रकरणात शिवाजी गंगाधर पांचाळ यांच्या तक्रारीवरून संभाजी नागनाथ पांचाळ , चंद्रकला नागनाथ पांचाळ , बालाजी पांचाळ , महानंदा पांचाळ , सुनंदा पांचाळ , मीना पांचाळ आणि आनंद पांचाळ यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ...

"म्युकर" "मायकोसिसचे" रुग्णांनी वेळेवर उपचार घेणे गरजेच :- डॉ तौसिफ परदेसी

Image
 "म्युकर" "मायकोसिसचे" रुग्णांनी वेळेवर उपचार घेणे गरजेच :- डॉ तौसिफ परदेसी     आरोग्य प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज *गरज नसताना मास्क चा अती वापर टाळावा  *एकच मास्क सतत वापरत असाल तर तो स्वच्छ धुवून वापरावा किव्हा बदल करा देशात गेल्या तीन-चार दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी रुग्णवाढ आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. त्यातच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी (Black Fungus Mucormycosis) या आजाराने देशासह राज्यात शिरकाव केलाय. कोरोनो संकट काळात दिवसागणिक गंभीर होत असताना पोस्ट कोविंड अन्य आजार बळावत असल्याचे स्पष्ट झाले असून कोरोनोनातून बरे होऊन बाहेर आल्यानंतर आता धोकादायक ठरत असलेल्या म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळत असल्याने आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याचे गरजेचे बनले असून मुखेड तालुक्यात म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत काही  म्युकर मायकोसिसचे रुग्णांसाठी योग्य उपाय योजना साठी आरोग्य विभागाने सतर्क करण्याची गरज निर्माण झाली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने म्युकर मायकोसिसचे रुग्णांनी वेळेवर उपचार घेणे गरजेच असल्याचे ...

हिमायतनगर येथील बैल जोड़ी चोरी उघड़किस आरोपी अटक

Image
हिमायतनगर येथील बैल जोड़ी चोरी उघड़किस आरोपी अटक हिमायतनगर येथील पोलिसाची दमदार कामगिरी हिमायतनगर प्रतिनिधि:- दिनांक 21/05/2021 हिमायतनगर येथील, शेतकरी शेख अंसार शेख रफीक अहेमद, यांचे शेतातिल बैल जोड़ी काही दिवसा पूर्वी चोरी गेली असता, त्या बाबत त्यांनी हिमायतनगर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती, सदर प्रकरणी हिमायतनगर पोलिस स्टेशन चे ए एस आय, रमेश कवळे,शेख महेबुब, हे पिआय भगवान् कांबळे साहेब, यांचे मार्गदर्शना नुसार तापस करीत होते. गुप्त महितीच्या आधारे सदर बैल जोड़ी रजवाड़ी येथील पुला जवळ असल्याचा सुगवा लागतच पोलिस कानिस्टेबल शेख महेबुब शेख जिलानी  यांनी त्या ठिकाणी गेले व् सदर बैल जोड़ी 【मुद्देमाल 】 जप्त करुण, हिमायतनगर पोलिस स्टेशन ला आणले व् आरोपी शेख सत्तार शेख अमीर वय 25 वर्ष राहणार शब्बीर कालोनी हिमायतनगर,(2)राजेश पेटाजी कामलवाड राहणार हिमायतनगर हल्ली मुकाम येवली टांडा (3)शेख रहेमान शेख मोइनराहणार हिमायतनगर यांचे विरूद्ध गु. रा. न.108/2021 कलम 379 भा. द. वि, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमायतनगर परिसरतील अनेक शेतकऱ्यांचे बैल जोड़या चोरिस गेल्याचे घटना घडल्या होत्या, ता...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर केला वारंवार अत्याचार :- आरोपीस अटक

Image
 लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर केला वारंवार अत्याचार :- आरोपीस अटक   मुखेड तालुक्यातील शेळकेवाडी येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मुखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला . आरोपीस अटक करून नांदेड येथील बालकारागृहात रवानगी करण्यात आली . शेळकेवाडी येथे राहत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार जबरदस्तीने जबरी अत्याचार केला  अचानक चकर येऊन पडली व् उलटया झाल्याने तिच्या आई पालकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले . मुलीने घडलेली हकीकत आई वडिलांना संगितल्याने आरोपी विरोधात मुखेड पोलिसांत  गु.र न  १३६/२०२१ ३७६ ३७६ (N) भादवि ४,१२ बालकाचे लैंगिक अत्याचार पासुन संरक्षण अधिनियम प्रमाणे  गुन्हा नोंद करण्यात आला . पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कुंभारे हे करीत आहेत .

खतांची दरवाढ रद्द न झाल्यास हातात कायदा घेऊ:- भाई आसद बल्खी

Image
 खतांची दरवाढ रद्द न झाल्यास हातात कायदा घेऊ:- भाई आसद बल्खी   महामारीच्या अडचणीच्या काळात रासायनिक खतांच्या किमती होणारी वाढ दुर्दैवी आहे . देशात पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीने नागरी त्रस्त असताना ऐन पेरणीच्या तोंडावर व रासायनिक खताच्या दरवाढीने शेतकऱ्याचे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून खत दरवाढीला विरोध झाल्यानंतर दरवाढ करणार नाही असे नुकतेच जाहीर केले होते . मात्र प्रत्यक्षात रासयनिक खतांच्या प्रत्येक पोत्यास सरासरी ७०० रुपयपर्यंत दर वाढलेला आहे . त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी खत दरवाढ मागे घ्यावी , अन्यथा दरवाढ रद्द न झाल्यास हातात कायदा घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलने करण्यात येतील करण्यात येईल असा इशारा शेकापचे भाई आसद बल्खी यांनी मुख्यमंत्री व कृषि मंत्री याना ईमेल दवारे दिला आहे . शेतीला अनेक वर्षा पासून रासायनिक खताची सवय झाल्यामुळे शेतीचा पोट उडालेला आहे यामुळे शेतकऱ्यांना  खत घेतल्या शिवाय पर्याय नाही , आधीच शेतकरी कोरोनाच्या संकटामुळे हवालदिल झालेला असून शेतीमाल पिकवला तर बाजार पेठेत त्याला कोणी घ्यायला तयार नाही आणि...

मुखेड येथे क्रांतिसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी

Image
 मुखेड येथे क्रांतिसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी करण्यात आली   मुखेड प्रतिनिधी :- लिंगायत धर्माचे धर्मगुरु, विश्वगुरु महात्मा बसवण्णा यांचा जन्म दिवस वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला झाला अशी धारणा असल्याने हा दिवस बसवेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. त्यामुळे त्याचे अनुयायी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात. यंदा ही बसवेश्वर जयंती आज 14 मे दिवशी आहे. महात्मा बसवण्णांनी समाज व्यवस्था परिवर्तन करण्यामध्ये मोठे योगदान दिले आहे.  दानधर्मापेक्षा दासोह महत्त्वाचा आहे. शिक्षण घ्या, वचने लिहा, वाचनसाहित्य वाचा. ज्ञानी व्हा, नैतिक बना, विवेकी बना, स्वतःमध्ये बदल करा. स्वतामधील दोष दूर करा. कर्मकांड दूर करा. स्वतःची स्तुती करू नका अशी सहज साधी सोपी वाटणारी पण माणसाला घडवणारी बहुमोलाची शिकवण बसवेश्वरांनी दिली आहे. आजही त्यांचे अनुयायी याचे पालन करतात. त्यामुळे मुखेड येथे क्रांतिसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी करण्यात आली उपस्थित मा. बालाजी आण्ण...

राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन अशी आहे नियमावली

Image
 राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला, अशी आहे नियमावली! मुंबई, 13 मे : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रेक द चेन  अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून 1 जूनपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची नियामवली जाहीर करण्यात आली आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलचा आदेश काढण्यात आला आहे. 31 मे पर्यंत कठोर निर्बंध वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता, मात्र यात आता आणखी एका दिवसाचा भर पडला आहे. या काळात दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे, तसंच घरपोच सेवा विक्री यासाठीही परवानगी कायम आहे. त्याचबरोबर इतर राज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी 48 तास आधी कोरोनाची आरटीपीसीआरटी टेस्ट गरजेची आहे. परराज्यातून माल वाहतूक करणारे गाड्यांमध्ये आता दोन जणांना प्रवास मुभा असेल. त्यासाठी देखील आरटीपीसीआर टेस्ट गरजेची असणार आहे. अशी आहे नवीन नियमावली (यावेळेत फक्त ही दुकाने सुरू राहणार आहेत) १) किराणा दुकाने...

मुखेड शहरात लोकांना बनावट ई-पास बनऊन देणारे गजाआड

Image
 मुखेड शहरात लोकांना बनावट प्रवास  ई-पास बनऊन देणारे गजाआड   मुखेड प्रतिनिधी :- बल्खी आसद  मुखेड शहरातील शिवाजीनगर कमानी समोरील न्यु साईराम डोरॉक्स अँन्ड मल्टीसहिसेस येथे छापा मारुन दुकानातील संगणकाची पाहणी केली असता सोमेश प्रल्हादराव ढेपाळे वय २७ वर्ष , व्यवसाय डाटा इंट्री ऑपरेटर रा.राजेश बार समोर मुखेड याने संगणक साहित्याचा वापर करुन बनावट ई पास तयार केल्याचे आढळुन आले . त्यावरुन सदर दुकानाचे मालक सोमेश प्रल्हादराव ढेपाळे वय २७ वर्ष , व्यवसाय डाटा इंट्री ऑपरेटर रा.राजेश बार समोर मुखेड यांना ताब्यात घेऊन अधिक विचारपुस केली असता त्यांनी बनावट ई पास तयार केल्याचे कबुल केले . तसेच त्याचा मित्र प्रताप सुदामराव सुडके , वय ३३ वर्ष , व्यवसाय झेरॉक्स सेंटर चालक , रा.अशोकनगर मुखेड यांनी देखील त्यास बनावट ई पास बनवुन दिल्याचे सांगीतले . त्यावरुन प्रताप सुडके यांचे योगेश झेरॉक्स सेंटर या दुकानात छापा मारुन तेथील संगणकाची पाहणी केली असता प्रताप सुदामराव सुडके याने देखील संगणक साहित्याचा वापर करुन बनावट ई पास तयार केल्याचे मिळुन आले . त्यावरुन दोन्ही दुकानदारांना ताब्यात घेऊन त...
Image
  बामणी येथील २८ लाखाचा विकास निधीचा घोटाळा करणाऱ्या १४ जणावर गुन्हा दाखल गटविकास अधिकारी  विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंचासह अन्य सहा जणावर  गुन्हा दाखल मुखेड प्रतिनिधि:-        मुखेड तालुक्यातील मौजे बामणी येथे ग्राम विकासासाठी शासणाच्या वतीने २०१५ ते २०२० या पंचवार्षिक योजनेत देण्यात आलेल्या २८ लाख ४१ हजार ७१९ रूपयाचे अपहार येथील ग्रामपंचायतीचे तात्कालीन कारभारी गटविकास अधिकारी २, विस्तार अधिकारी ३, इंजिनियर १, ग्रामसेवक ३, माजीसरपंच१, सरपंच पती १, माजी सरपंचाचे वडील १ असे एकून १४ जणांनी संगनमत करून अपहार केला असल्यांचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे संबंधित चौदा जणांविरुद्ध मुक्रामाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        बामणी येथील ग्रामपंचायत विकास निधीत घोटाळा झाला असल्याने वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन निदर्शनास आणण्याचे शेख नबीसाब महेताबसाब यांनी प्रयत्न करून ही या निवेदनाची दखल न घेता अपहार करणाऱ्यांची पाठ राखण करण्याचे काम येथील अधिकारी केले असल्...

मुखेड तालुक्यात अवकाळी पावसासह वीज पडुन एक शेतकरी व तीन म्हशीचा मृत्यु

Image
 मुखेड तालुक्यात अवकाळी पावसासह वीज पडुन एक शेतकरी व तीन म्हशीचा मृत्यु   मुखेड प्रतिनिधि :- बल्खी आसद गेल्या सात दिवसापासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने शुक्रवारी ( ता . 7 ) रोजी कहरच केला . मुखेड  तालुक्यातील शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला . यात तुपदाळ खु . येथील रमेश पंढरीनाथ दोमाटे ( ५५ ) या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला . तर वडगाव येथील धुरपतबाई कांबळे , चव्हाणवाडी येथील अशोक जाधव तर थोटवाडी येथील शंकर पांचाळ यांच्या म्हशीवर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या .गावात विज पडून तीन जनावर दगावली असून हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या जिवावर बेतला आहे . गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्यांचे आंबा या फळपीकाचे मोठे नुकसान झाले आहे . दररोज पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरीही वैतागला असून शेतातील मेहनत करणे अवघड झाले आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे . हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या जिवावर बेतला आहे .  मृत शेतकरी रमेश दोमाटे यांच्या पश्चात पत्नी ,...

मुखेड येथे मराठा समाजाच्या युवकांनी केले केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन..

Image
 मुखेड येथे मराठा समाजाच्या युवकांनी केले केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन..   मुखेड प्रतिनिधि :- बल्खी आसद  सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हे आरक्षण वैध असल्याचा दिलेला निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने रद्द ठरवला आहे. राज्यातील मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.आहे या निर्णयाने संपूर्ण महारष्ट्रात केंद्र व राज्य सरकारवर  नाराजगी  व्यक्त केली गेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना ते टिकवण्याची जबाबदारी हि राज्य सरकारची असताना सरकार मात्र यावरती सरकारचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते . सरकारला मराठा आरक्षणाची काहीच काळजी नसून मराठा समाजाच्या तोंडाला नेहमीच पाने पुसण्याचे कामे केले आहे . आज सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षण क्षेत्रात नाकारण्याचे आदेश देत आहे . यामुळे सकल मराठ...

कोरोना काळात बेटमोगरा येथील ग्रामसेवक कर्तव्यापासून होम कॉरटाईन

Image
  कोरोना काळात बेटमोगरा येथील ग्रामसेवक कर्तव्यापासून होम कॉरटाईन   तब्बल महिनाभरापासून ग्रामसेवकाची गैरहजेरी !  बेटमोगरा प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी कोरोना महामारीच्या संकटकाळी परिस्थितीत तालुक्यातील बेटमोगरा सज्जा येथील ग्रामसेवकाची ग्रामस्थांना  सतत "Out of coverage area" ची लस देऊन तब्बल एक महिन्यापासून बेटमोगरा ग्रामपंचायतीच्या कामकाज व कर्तव्यापासून कोसो दुर होम कॉरटाईन असल्याने येथील नागरिकांत नाराजी पसरलल्याचे दिसून येत आहे. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीच्या सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी या नावाने ओळखले जाते.मात्र तालुक्यातील बेटमोगरा सज्जा येथील ग्रामसेवक हे गेल्या महिनाभरापासून ग्रामपंचायत कार्यालयात गैरहजर असल्याने येथील नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत.तसेच कोरोना महामारीच्या काळातही गावात कोरोना जनजागृती निर्माण करने गरजेचे असताना देखील गावात कोणतीही उपाययोजना राबविण्यात आली नसल्याने ग्रामसेवकावर सरपंच,ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थांमध्ये तिव्र संतापाची लाट उसळली आहे. देशात सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट उसळली असून त्यासह बेटमोगरा येथे सुद्धा कोरोना रुग्णांच्या...

मुक्रमाबाद ता मुखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे : ऑल इंडिया तन्ज़ीम ए इन्साफची मागणी

Image
   मुक्रमाबाद ता मुखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे : ऑल इंडिया तन्ज़ीम ए इन्साफची मागणी  मुखेड :- आसद बल्खी मुक्रमाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे यासाठी आज ऑल इंडिया तन्ज़ीम ए इन्साफच्या वतीने तहसीलदारांना  निवेदन देण्यात आले आहे. आरोग्य म्हणजे केवळ व्याधी किवा विकलांगता याचा अभाव नव्हे, तर संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य अशी जागतिक आरोग्य संघटनेची आरोग्य विषयक संकल्पना आहे. ‘‘सर्वासाठी आरोग्य‘‘ हे उद्दिष्ट ठेवून ते साध्य करण्याची बांधीलकी राज्य शसनाने स्विकारली असून त्यासाठी गेल्या काही वर्षापासून प्रतिबंधक, प्रवर्तक, उपचारात्मक आणि पुनर्वसनात्मक आरोग्य सेवा जनतेला पुरविणेकरीता आरोग्य विषयक सुविधांचे जाळे उभारणेसाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करणेत येत आहे. राज्याच्या कानाकोप-यामध्ये ग्रामीण जनतेला आरोग्य विषयक सुविध पोहचविणेसाठी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांची स्थापना करणेत आली आहे.परंतु  मुकमाबाद येथे लाखो रूपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य इमारत बांधण्यात आली या इ...

रमजान ईद च्या खरीदीसाठी मुस्लिम समाज बाहेर पडू नये:- युवा कार्यकर्ते अदनान पाशा

Image
  रमजान ईद च्या खरीदीसाठी मुस्लिम समाजाने बाहेर पडू  नये :- युवा कार्यकर्ते अदनान पाशा शासनाने गर्दीच्या ठिकाणी काटेकोर पणे कार्यवाही करावी    जनतेनी अफवा वर लक्ष न देता लसीकरण करून घ्यावे     रमजान ईदचा खर्च कमी करुन गरीब,अपंग,निराधार,विधवा अशा लोकांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी  प्रतिनिधि :- बल्खी  आसद मुखेड :- राज्यातील तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संचारबंदी राज्य सरकारच्या वतीने घोषित करण्यात आली आहे. दरम्यान जीवनावश्यक कामांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये,कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या वतीने कडक संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात सर्वांनी नियमांचे पालन करावे, जेणेकरून साखळी तोडण्यात आपल्याला यश मिळेल व पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही. शासनाने संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवांना मुभा दिली आहे. त्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनी याचा गैरवापर करु नये. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.  मुस...