Posts

Showing posts from October, 2020

नागेश गायकवाड यांचा ' कोविड योध्दा ' म्हणून सन्मानीत

Image
नागेश गायकवाड यांचा ' कोविड योध्दा ' म्हणून सन्मानीत         मुखेड तालुक्यातील सांगवी बेनक येथील रहिवासी तथा पुणे महानगरपालिकेत वाहक म्हणून कार्यरत असलेले नागेश भीमराव गायकवाड यांना ' कोविड योध्दा ' म्हणून सन्मानीत करण्यात आले आहे . पुणे महानगरपालिका अंतर्गत येत असलेल्या कोथरूड -बावधान क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम व उपायुक्त नितीन उदास यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला . संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये असताना आपल्या जिवाची बाजी लावून कोरोना महामारीमध्ये पुणे महानगरपालिका अंतर्गत येत असलेल्या कोथरूड - बावधान कार्यक्षेत्रात २०० कर्मचारी वर्गाचे दैनंदिन कामाचे योग्य नियोजन केले . सलग चार महिने जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावले . पुणे महानगरपालिकेच्या वतीने नागेश गायकवाड यांचा ' कोविड योध्दा ' म्हणून सन्मान करण्यात आला .

पिक विमा मंजुर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करा:-शेतकरी बचाव संघर्ष समितीची

Image
 पिक विमा मंजुर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करा कृषिराज्यमंञी विश्वजीत कदम यांच्याकडे शेतकरी बचाव संघर्ष समितीची मागणी -  बार्‍हाळी/ प्रतिनिधी जिल्हातील शेतकऱ्याचे अतिवृष्टी पावसाने पावसामुळे आतोनात नुकसान आहे. शेतकऱ्या च्या हाताला आलेले मुग, उडीद,सोयाबीन पिकाला आक्षरशा मोड आले होते.या नुकसानीमुळे जिल्हातील शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्याचे आर्थिक बजेट कोलमंडले आहेत.देशातील बळीराजा चा सर्वात मोठा सण दिपावळी कशी साजरी करावी हे बळीराजा समोर आव्हान आहे.या सर्व बाजुचा विचार करून सरकारने अतिवृष्टी व ढगफुटीबाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पीकविम्याची रक्कम जमा करण्यात यावा अशी मागणी "विचार छञपतींचा सन्मान बळीराजांचा" हे घोष वाक्य घेवुन मैदानात ऊतरलेल्या शेतकरी बचाव संघर्ष समितीचे धनजंय सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बालाजी पाटील सांगवीकर,बालाजी पा.ढोसणे यांनी नांदेड येथे राज्याचे कृषिराज्यमंञी विश्वजीत कदम यांची भेट घेवुन केली.  यामध्ये संघर्ष समितीच्या वतीने जाचक अटी रद्द करून शेतकरी कंगाल, पीकविमा कंपनी मालामाल हे धोरण तात्काळ बदलून शेतकऱ्यांच्या खात्या...

आंबुलगा येथील शिक्षक बिरादार डि. व्हि यांना केंद्रातर्गत गुरू गौरव पुरस्कार प्रदान

Image
  आंबुलगा येथील शिक्षक बिरादार डि. व्हि यांना केंद्रातर्गत गुरू गौरव पुरस्कार प्रदान मुखेड / प्रतिनिधी      मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा बु)  येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक बिरादार डि व्हि यांनी आंबुलगा केंद्रात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, यंदाचा केंद्रगस्तरीय आदर्श शिक्षक म्हणून गुरू गौरव पुरस्कार मिळाले आहे. हा पुरस्कार मुखेड पंचायत समितीचे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी राम भारती व नुतून गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांच्या हस्ते बिरादार यांना गुरूगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.  बिरादार डि.व्हि हे आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी आंबुलगा येथील शाळेत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले. प्रत्येक उपक्रमात त्याचा सहक्रीय सहभाग असतो. विद्यार्थ्यांना नेहमी त्यांच मौलाचे मार्गदर्शन असते.या सर्व कार्याची नोंद घेऊन त्यांना यंदा आंबुलगा केंद्रातील शाळेतून आदर्श शिक्षक म्हणून गुरू...

सिटू आणि इतर ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या लढ्यास यश

Image
  सिटू आणि इतर ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या लढ्यास यश ऊस तोडणी  मजुरांना 14 टक्के मजुरी वाढ. मुकादमांना 19 टक्के कमिशन मिळणार. सर्व ऊस तोडणी मजुरांना विमा योजना लागू करणार. ऊस तोडणी मजुराचे कल्याणकारी मंडळाचे कामकाज नोव्हेंबरमध्ये सुरू होणार. ऊस तोडणी कामगारांचा संप मागे....  पुणे येथे दि. 27/10/2020 रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवारसाहेब यांच्या उपस्थितीत राज्य सहकारी साखर संघ व राज्यातील नोंदीत ऊस तोडणी कामगार संघटनांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सुरुवातीला सर्व तोडणी कामगार संघटनांचे म्हणणे स्वतंत्रपणे पवार साहेबांनी ऐकून घेतले व त्यानंतर राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी वरील प्रमाणे घोषणा केली.  ऊस तोडणी मजुरांना प्रति टन 14 टक्के मजुरी वाढ,  कमिशन 19%  व सर्व कामगारांना विमा योजना लागू करण्याची घोषणा त्यांनी केली. ऊस तोडणी मजुरांसाठी कल्याणकारी महामंडळाचे कामकाज नोव्हेंबर पासून सुरू करण्याची घोषणा या वेळी शरद पवार साहेबांनी केली. राज्यात ऊस तोडणी कामगारांचा संप सुरू आहे...

जाहुर तलावात बुडून नवतरुणास २४ तास उलटले तरी नवतरुण मुलास बाहेर काढण्यात प्रशासनास अद्याप अपयश

Image
  जाहुर तलावात बुडून नवतरुणास २४ तास उलटले तरी नवतरुण मुलास बाहेर काढण्यात  प्रशासनास अद्याप अपयश आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा मागविणे तातडीचे मुखेड तालुक्यातील मौजे जाहुर ता.मुखेड येथील  नव तरुण  युवक नामे माधव चांदू भुयारे हा दैनंदिन प्रमाणे दि.२१ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास गावाजवळील तलावात पोहायला जाऊन तलावतच गायब झाल्याची घटना घडली असून घटना घडून २४ तास होवून गेले परंतु प्रशासन यंत्रणा अतिशय मंदगतीने कार्य बजावत असल्याने संबंधित प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. माधव भुयारे हा अतिशय हुशार व होतकरू जिद्दी असलेला नवतरुण मुलगा नुकताच दि. १७ ऑक्टोबर २०२० रोजी मेकॅनिककल इंजिनिअरिंग ची परीक्षा दिला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. माधव भुयारे च्या दुर्दैवी मृत्यू ने जा गावामध्ये व परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. संबंधित प्रशासनाने आपत्कालीन सेवा मागवून त्वरीत त्या तलावात बुडलेल्या नवतरुण मुलाचे प्रेत बाहेर काढण्यात यावे असे गावकऱ्यांकडून बोलल्या जातय.

मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अॅड सुनील पौंळकर,सचिव संतोष बेळगे तर कोषाध्यक्ष नामदेव यलकटवार यांची निवड

Image
मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अॅड सुनील पौंळकर,सचिव संतोष बेळगे तर कोषाध्यक्ष नामदेव यलकटवार यांची निवड ----------------------------------- मुखेड (प्रतिनिधी) - मराठी पत्रकार परिषद संलग्न मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचा एक वर्षाचा कार्यकाल संपुष्टात आल्याने जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर व सरचिटणीस सुभाष लोणे यांच्या परवानगीने दि. 18 /10/ 2020 रोजी मुखेड येथे तालुक्यातील पत्रकाराची महत्वपूर्ण  बैठक ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोनापुरे,प्रा.यशवंत बोडके व अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.या बैठकीत नविन कार्यकारणीची निवड करण्यात आली ती कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष अॅड सुनील पौंळकर,कार्याध्यक्ष  विनोद आपटे(मुक्रामाबाद),उपाध्यक्ष गणेश जाधव (बाहाराळी),विजय पांपटवार(जांब),सचिव संतोष बेळगे, सहसचिव नंदकुमार खंकरे (मुक्रामाबाद),कोषाध्यक्ष नामदेव यलकटवार,सहकोषाध्यक्ष नवनाथ भद्रे,संघटक माधव वारे,सहसंघटक साईनाथ कोडगिरे( बाहाराळी),सल्लागार शिवाजी कोनापुरे,यशवंत बोडके,किशोर संगेवार,किशोरसिंह चौहाण,दत्तात्रय तिपणे,  कार्यकारणी सदस्य शादुल होनवडजकर, दयानंद ...

‘नुकसानग्रस्त सोयाबीनची माहिती विमा कंपनी, कृषी विभागास कळवा’: बालाजी पाटील ढोसणे यांचे शेतकर्‍यांना आवाहन

Image
  ‘नुकसानग्रस्त सोयाबीनची माहिती विमा कंपनी, कृषी विभागास कळवा’: बालाजी पाटील ढोसणे यांचे शेतकर्‍यांना आवाहन मुखेड (प्रतिनिधी) पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण घेतलेल्या, पावसाने सोयाबीनचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती पीक विमा दाव्यासाठी कृषी विभाग तसेच विमा कंपनीस  तत्काळ कळवावी, असे आवाहन शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांनी केले. सध्या सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणी करुन गोळा न करता शेतात वाळवण्यासाठी ठेवली आहे. पावसामुळे हे सोयाबीन भिजले असल्यास पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना काढणीपश्‍चात नुकसान भरपाईसाठी पीक विमा परतावा मिळू शकतो. त्यासाठी पीक विम्यासाठी सोयाबीन अधिसूचित क्षेत्रातील शेतात सोयाबीन कापणी करुन सुकवण्यासाठी पसरून ठेवलेल्या ठिकाणी कापणीपासून १४ दिवसांत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानीस ग्राह्य धरता येतात. यासाठी शेतकऱ्यांनी ही घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत याबाबतची सूचना इफको टोकीयो पीक विमा कं...

मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील पडीत जागेवर फुलवीले नंदनवन

Image
  मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील पडीत जागेवर फुलवीले नंदनवन रामदास पाटील सुमठाणकर मित्रपरिवाराचा स्तुत्य उपक्रम मुखेड प्रतिनिधि:- बल्खी आसद   मुखेड, देगलूर तालुक्यात स्वप्रसिद्धीची कुठलीच अपेक्षा न करता निश्वार्थ भावनेने दु:खीतांची सेवा हेच आपलं कर्तव्य मानणारे रामदास पाटील सुमठाणकर यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक सामाजिक कार्य व उपक्रमात निश्वार्थपणे साथ देणारा त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व पुर्व प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या पडीत जागेत पिण्याचे पाणी, नागरिकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था, वृक्षारोपन, लाईटची व्यवस्था करुन नंदनवन फुलवले त्यामुळे त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.           रामदास पाटील मित्र परिवाराच्या वतीने लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून सर्वसामान्य गोरगरीब समाज हा अन्नावाचून उपाशी राहता कामा नये एकवेळ आपण उपाशी राहू परंतू गरीब कुटुंबाना अन्नाचा पुरवठा करू ! हे ध्येय उराशी बाळगुन आजपर्यंत अविरतपणे शहरातील खाजगी व शा...

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान

Image
  शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान   ---------------------------------------------------------- विविध क्षेत्रातील 101 जणला केले सन्मानित ----------------------------------------------------------  मुखेड (वार्ताहर)- मागील सात महिन्यापासून जिल्ह्यासह राज्यभरात कोरोना महामारी आजाराने थैमान घातले असून नागरिक भीतीने भयभीत झाले आहेत.जिकडे तिकडे आजाराचा प्रसार वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती.अशा संकट काळात तसूभरही आपल्या कर्तव्यापासून थोडेसे ही विचलित न होता न मागे हटता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या खऱ्या खुऱ्या कोरोनायोद्धाचा यथोचित सन्मान शिवाजी फाऊंडेशन व साप्ताहिक मुखेडचे लोकसंकेतचे संपादक नामदेव यलकटवार यांच्या संकल्पनेतून नुकताच करण्यात आला आहे.              विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींना यावेळी गौरविण्यात आल्याने या उपक्रमाचे तालुका, जिल्हाभरासह भारतातून कौतुक केले जात आहे.कोरोना महामारी वाढत्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजी आ...

आ.राम पाटील रातोळीकर यांच्या घरासमोर समोर मराठा आरक्षणासाठी " जागर आंदोलन "

Image
  आ.राम पाटील रातोळीकर यांच्या घरासमोर समोर मराठा आरक्षणासाठी " जागर आंदोलन " मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नासाठी लढाई करणार  : आ रातोळीकर मुखेड प्रतिनिधि:-  मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि.6 ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता रातोळी येथे भाजपाचे आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या घरासमोर जागर आंदोलन करून लक्ष वेधले मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या :  राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडे घटनापीठ लवकर स्थापन करण्यासाठी अर्ज करावा, घटनापीठ स्थापन झाल्यानंतर सुनावणी लवकर घ्यावी, घटनापीठ स्थापन केल्यानंतर आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठवावी, हे शक्य नसेल तर मराठा आरक्षण बाधित ठेवण्यासाठी नवीन अध्यादेश काढावा, तसेच सारथी संस्था पूर्ववत सुरू करून सार्थीचे कामकाज व विविध कोर्स पुन्हा सुरू करण्यासाठी 1000 कोटी रुपयाचा निधी द्यावा २२ जुलै  2020 पासून महाशिव आघाडी सरकारने परिपत्रक काढून आर्थिक दृष्ट्यादुर्बल घटकांच्या 100% आरक्षणातून मराठा समाजाला वगळण्याचा निर्णय घेतला तो रद्द करून मराठा समाजाला दिलासा द्यावा,मराठा आरक्षणाब...